मुंबई : शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांवर अपात्रतेची कारवाई उभी ठोकली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्ताराला ब्रेक लागला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा ठोकला आहे.
हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आमदारांवर सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. आगामी 15 दिवसांमध्ये 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावाच बच्चू कडू यांनी केला आहे. सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. 20 ते 25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पुर्ण राहिल. सरकार कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो.मंत्रिमंडळ विस्तार होत नाही यांच कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदाराच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल. असंही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
काॅंग्रेस आमदारांचा एक गट फुटणार असल्याच्या चर्चा
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई झाली तर भाजपने दुसरा प्लॅन देखील करून ठेवल्याची चर्चा होती. यातच अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसचे 22 ते 25 आमदार फुटणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र त्यावर खुद्द अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत ह्या सगळ्या चर्चा निष्फळ असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, यातच आता निवडणुक आयोगासमोर धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षासंदर्भात सुनावणी होणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगाला लेखी उत्तर देण्यात आलं आहे. जो पर्यंत 16 आमदारांवरील अपात्रतेसंदर्भात निकाल लागत नाही. तोपर्यंत निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेनेसंदर्भात कोणताही निर्णय देऊ नये. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या सुनावणीत कोणच्या बाजूने निकाल लागतो. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे राजकीय भवितव्य अवलंबून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
- हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
- हेही वाचा..““या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
- हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र