अमरावती : गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद सुरू आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या वेळी डॉ. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून घोळ झाला होता. त्यानंतर काॅंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. यातच राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांकडून यावर आपली सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. नाना पटोले हे डॅशिंग लीडर आहेत. हा वाद लवकराच लवकर मिटेल अशी आशा काॅंग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
संजय राऊत यांनी सकाळी नाना पटोले यांच्यावर टिका केली होती. नाना पटोले यांनी जर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता. तर हे सर्व राजकीय चित्र निर्माण झालं नसतं. त्यावर यशोमती ठाकूर यांनी देखील राऊतांच्या विधानावर समर्थ दिलं आहे. जर नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर चित्र वेगळं राहिलं असतं. तसेच काॅंग्रेसमधील धुसफुस लवकरच ठिक होईल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा. पटोले यांची राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकाटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. अशी प्रखर टिका सामानामधून नाना पटोले यांच्यावर कऱण्यात आली आहे.
हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
तसेच पुढे असं म्हटलं आहे की, विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक राज्यापालांनी होऊच दिली नाही. व त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीस मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल. अशी टिकाही सामानातून करण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
- हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
- हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
- हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”
- हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”