मुंबई : काही आठवड्याच्या अंतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा आज आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी अनेक विकास कामाचं भूमीपुजन करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदी सातत्याने मुंबई दौऱ्यावर येत असल्याची टिका विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टिका करतांना मोदी आता निवडणुका होई पर्यंत मुंबईतच घर घेतील, असा टोला हाणला आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, की 10 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे, खास करून संपर्क-दळणवळ व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आहे. मुंबई-सोलापुर, आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन्सचा शुभारंभ होणार आहे. सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचेही राष्ट्रार्पण होणार आहे. असं त्यात त्यांनी नमुद केलं आहे.
हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
“जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईतही राहु शकतो. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिंधे गटातील नेते असमर्थ आहेत. त्यामुळे मोदी जरी मुंबईत आले, तसेच आख्खा देश जरी याठिकाणी लावला तरी मुंबई महापालिका शिवसेना जिंकेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त करत याची पुर्ण खात्री आता भाजपला झाली असून मोदींचा पत्ता मुंबईत टाकला जात आहे. असा खोचक टोलाही त्यांनी भाजपला हाणला. वंदे भारत ट्रेन हे निमित्त असून मुंबई महापालिका पंतप्रधानांना जिंकायची आहे. परंतु आम्ही देखील तयार आहोत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..“जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं”, निवडणुकीसाठी धंगेकरांनी रणशिंग फुंकलं
दरम्यान, राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला, मोदींचं भाषण होऊ दिलं नाही. मोदी गोंधळात भाषण करत राहिलेत. परंतु त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न विचारले असता, त्यावर तुम्ही का उत्तर देऊ शकले नाहीत. प्रश्नपत्रिका अगदी सोप्पी होती. परंतु त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. लोकसभेत राहुल गांधी यांनी अगदी सोप्पे प्रश्न विचारले होते. असंही राऊतांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “
- हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
- हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
- हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
- हेही वाचा..““या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले