पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीची जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला सोडल्याने शिवसेना पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे नाराज झाले. त्यानंतर त्यांनी चिंचवडच्या पोटनिवडणुकीकरीता अपक्ष म्हणून अर्ज सादर केला. त्यामुळे याठिकाणी आता भाजप, महाविकास आघाडी आणि राहुल कलाटे अशी लढत होण्याची शक्यता असतांना शिवसेनेचे आमदार सचिन अहिर उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन राहुल कलाट्यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे राहुल कलाटे आता काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
हेही वाचा..““या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
“आपल्या विचारांना प्रभावी झालेले आणि त्यांचे राजकीय भवितव्य अंधारी होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षप्रमुखांनी देखील त्यांना सांगितलं आहे की, तुम्ही तरूण आहात, आता जे काही झालं आहे, परंतु आगामी काळात महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा पक्षप्रमुख असतील, एक हमी घेऊन तुम्हाला भविष्यकाळात राजकीय दृष्टीने कशा पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल, असा निरोप आमच्या पक्षप्रमुखांचा घेऊन राहुल कलाटे यांच्याकडे गेलो होतो. यातच तुम्हाला चांगला राजकीय भवितव्य असल्याने तुम्ही यातून माघार घ्यावी,” अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली असल्याचं सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांना केली आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रचारक यादीत स्थानिक नेत्यांना ‘डच्चू’ आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडेंना स्थान नाही
राहुल कलाटे यांनी काल उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, परंतु त्यांचं काल बोलणं झालं नाही. परंतु आज उद्धव ठाकरे यांना राहुल कलाटे यांच्याशी बोलणं झालं आहे. पक्षप्रमुखांनी देखील त्यांना विनंती केली आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घेतली आहे. त्यांचा निर्णय लवकरच आम्हाला कळवतील. तसेच आम्ही आशावादी आहोत. की ते चांगले निर्णय घेतील. असंही सचिन अहिर यांनी सांगितले.
हेही वाचा..“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीकरीता भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रावादीचे नेते नाना काटे रिंगणार उभे आहेत. यातच अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनी अर्ज सादर केला आहे. यातच आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज सांयकाळी 3 वाजेपर्यंत ही मुदत आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून कोण माघार घेणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”
- हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “
- हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
- हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
- हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात