नाशिक : महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या प्रकल्पांना विरोधच करणार. मग तो गुजरातला गेला काय किंवा अमेठीला गेला काय मी त्याचा विरोध करणार. असं म्हणत विधान परिषदेचे आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. तसेच त्यांनी मागील सरकारच्या काळातील सरकारचं कौतुकही केलं आहे.
हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात अनेक उद्योग आलेत. त्यानंतरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय येण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याला महत्वाचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात उद्योगांसाठी आखण्यात येणारं नवीन धोरण कुठंतरी चुकत आहे. नवीन येणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यांच काम केलं जात नाही. असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
ज्यावेळी एक कोटी दोन कोटी रूपये घेऊन एखादा उद्योगपती महाराष्ट्रात येतो, त्याला राजकीय वातावरण निर्मिती देखील झाली पाहिजे. आता माझ्या अजेंठ्यावर एक आहे की खानदेशात उद्योग कसे आणू शकतो. जळगावसोबत माझं भावनिक नातं आहे. अनेक माझे मित्र पुण्यात शिकत होते. ते परत जळगावमध्ये आलेच नाही. ते तसेच बाहेर गेलेत. कारण ज्या पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्या पद्धतीच्या नोकऱ्याच याठिकाणी त्यांना नाहीत. असंही तांबे म्हणाले.
Read also
- “काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले
- हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल
- हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?
- हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान