नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वरील चर्चेवरून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. याच दरम्यान विरोधी पक्षातील खासदारांनी मोदींच्या संपुर्ण भाषणात राज्यसभेच्या सभागृहात मोठा गदारोळ करत अदानी अदानी च्या घोषणा दिल्या. यातच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”
लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वरील चर्चेमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, सरकारने अर्थसंकल्पामध्ये बेरोजगारी, गरीबी, मंदी, महागाई, वृद्धी विरूद्ध महागाई, आयात- निर्यातीमधील असमतोल या विषयांचा समावेश करायला कदाचित विसरले असावे असा उल्लेख केला. या देशातील शेतकऱ्यांना भरडधान्ये ही नवी गोष्ट नाही. आजही आम्हा मराठी घरांमध्ये एकवेळ ज्वारी किंवा बाजरीची भाकरीच खाल्ली जाते. हे काही लोकांसाठी नवं असू शकतं परंतु शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रत्येकासाठी हे नवं नाही. या सगळ्या मुद्यांवरून एकप्रकारचा जिगोईंझम जो सुरू झाला आहे. असंही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “
पुणे जिल्ह्यामध्ये एका केंद्रीय मंत्रीमहोदयांनी बोलताना येत्या जुनमध्ये भारताला मंदीची झळ बसेल असे स्पष्ट केले होते. मला या मुद्यांवरुन सरकारमध्ये विसंवाद दिसून येत आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्री या मुद्यांवर काहीच बोलताना दिसत नाहीत. तीन चार ठिकाणी याचा ओझरता उल्लेख आलेला आहे. असंही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
माझ्या एका सहकाऱ्यांनी पेन्शन स्कीमचा (ईएसओपी) मुद्दा उपस्थित केला आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो आवर्जून नमूद केला. देशातील साठ लाख पेन्शनर्संनी एका दिवसाचे उपोषण केले होते. त्यांचे प्रतिनिधी ४ मार्च रोजी माननीय प्रधानमंत्र्यांना देखील भेटले होते. यावेळी सभागृहाच्या माध्यमातून केंद्र सरकारला सुचना केली की, पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल. काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याचीही आठवण यानिमित्ताने सरकारला करुन दिली. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
दरम्यान, पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकार अमृत काळ म्हणते. सरकार सेस गोळा करते. शिक्षण, आरोग्य, कृषी सेस गोळा केला जातो. तो कुठं जातो? शेतीप्रश्नांबाबत बोललं जातं. पीएमकिसान पेमेंट बाबत सांगितलं की आपण केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांऐवजी ८ हजार रुपये देणार आहे. या सरकारने ती रक्काम सोळा हजार केली असती तर आम्ही आणखी टाळ्या वाजविल्या असत्या. कारण शेतीचा खर्च वीस टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून अधिकची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. पण शेतीबाबतची तरतूद तेवढीच आहे.
Read also
- हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
- हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
- हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला
- हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?