मुंबई : महाराष्ट्रात अत्यंत वादग्रस्त ठरलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राज्यपाल पदाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने रविवारी 13 राज्यांतील राज्यपाल आणि नायब राज्यपाल बदलले आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली आहे. नवे राज्यपाल रमेश बैस यांचं स्वागत तर मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे.
हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
यातच काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गेल्या 9 वर्षात देशातील अनेक राज्यांत मोदी सरकारने नेमलेल्या राज्यपालांप्रमाणेच भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द राज्यपाल पदाची प्रतिष्ठा प्रंचड कमी करणारी होती. तसा कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक होता. अनेक राज्यपाल आले पण अशा पद्धतीने जनतेच्या तिरस्काराचे धनी कोणाला व्हावे लागले नाही. अशी खोचक टिप्पणी सचिन सावंत यांनी दिली आहे.
हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
जनतेने नाकारून ही व कोश्यारीजींनी मागणी करूनही भाजप त्यांना हटवत नव्हती, हा महाराष्ट्राचा अनादर होता. एक अकेला सबपे भारी म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले. जनमताच्या रेट्यासमोर अनेक हुकुमशाह्या कोलमडून पडल्या आहेत आणि जनतेचा रेटा वाढत चालला आहे हे लक्षात ठेवा. एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार अनेक संविधानिक संस्थांचे व भाजप नेत्यांचे नैतिक अध:पतन करवत आहे. अशी टिकाही त्यांनी केली.
हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, येणाऱ्या राज्यपालांकडून अधिक अपेक्षा नाही. कोश्यारींचे पदावरून जाणे हे त्यांच्यासाठीही योग्य आहे. सातत्याने भाजपच्या सांगण्यावरून विरोधकांना छळणे व मर्यादा ओलांढण्याऐवजी आता ते स्वत:ला गुंतवू शकतील. कोश्यारीजींना पुढील कार्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आयुरायोग्य लाभो हीच सदिच्छा. असंही सचिन सावंत यांनी म्हटलं.
१/४ गेल्या ९ वर्षांत देशातील अनेक राज्यांत मोदी सरकारने नेमलेल्या राज्यपालांप्रमाणेच भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द राज्यपाल पदाची प्रतिष्ठा प्रचंड कमी करणारी होती.
तसा कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 12, 2023
Read also
- हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे
- हेही वाचा..““काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले
- हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल
- हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?
- हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल