मुंबई : राजकीय नेतृत्वाकडून काही ना काही कारणातून कुणावर खटले, कुणामागे ईडी, कुणामागे सीबीआय लावता येईल का, हे प्रकार सुरु आहेत. हे महाराष्ट्रातच नाहीये. गुजरात, झारखंडमध्येही याच तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी आज केंद्रात ज्यांची सत्ता आहे, पण राज्यात त्यांची सत्ता नाहीये, अशा ठिकाणी सत्तेवर असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करायचं. हाही एक उपक्रम भाजपनं अनेक राज्यांमध्ये ज्याठिकाणी बिगर भाजपची सरकार आहे, तिथे घेतला गेला. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
“गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ते शरद पवार पुढे म्हणाले की, राज्यात अनेक प्रश्न आहेत, राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. निवडणूकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना दिसले नाही. पुढच्या निवडणूकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले, आता 2024 साठी आता 5 ट्रीलियन इकॉनॉमी हे नवीन आश्वासन दिले जात आहे.
“विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
तसेच त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, ज्या कार्यक्रमाची आश्वासने दिली ती वरच्या पातळीवर दिली. 2018 मध्ये एक आश्वासन दिलं होतं की 2022 पर्यंत सर्व ग्रामपंचायतीत आम्ही इंटरनेट देऊ. ते त्यांनी अजून पुर्ण केलं नाही. 2022 पर्यंत प्रत्येकाकडे पक्कं घर असेल असं सांगितलं होतं. पण काहीच दिलं नाही. प्रत्येक भारतीयांना शौचालयाची सुविधा देण्याची घोषणा केली. तेही पुर्ण झालं नाही. बिहारमध्ये 56.6 घरात टॉयलेट नाही. झारखंडमध्ये 43, लडाख, 58, ओरिसात 40 टक्के घरात टॉयलेट नाही. ही सरकारचीच आकडेवारी आहे. 2022 पर्यंत प्रत्येकाला नळ दिला जाईल, ही योजना आता 2024 पर्यंत वाढविली आहे. म्हणजे हे आश्वासनही पाळगलं गेलं नाही. असंही शरद पवारांनी सांगितलं.
चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
दरम्यान, आज शरद पवार यांच्या उपस्थितत ठाण्यात राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाण्यातील तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तसेच आगामी काळातील निवडणुकांसाठी राज्यभर दौरे करणार असून त्याची सुरूवात आज ठाण्यातून केली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तसेच पुण्यानंतर सर्वात जास्त विधानसभा मतदार संघ ठाण्य़ात आहेत. त्यामुळे ठाण्याकडे आमचं विशेष लक्ष राहणार आहे असंही शरद पवार म्हणाले.
Read also
- “राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही”; गुलाब नबी आझाद
- “राष्ट्रवादीकडे अनेक जण आकर्षित, काही राज्यात भाजपची सत्ता गेलीय, त्यामुळे जोमाने काम करा”
- “पुन्हा मंत्रिपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल”; गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादीचा टोला
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज