मुंबई : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला उद्यापर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. आरक्षणामध्ये घुसखोरी केली तर ४०० जातींचा असलेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी महासंघाचे अध्यक्षांनी दिला आहे.
हेही वाचा…जीव वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर विविस्त्र धावत राहिली, भाजप आमदारांसह त्यांच्या पत्नीवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतांना आता ओबीसी समाजाने देखील सरकारला कडक इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या. आधीच ओबीसी समाजात तब्बल ४२३ च्या वर जाती आहेत. त्यामध्ये मराठा आले तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाहीचे दाखले पुरावे असतील तर त्यांना आरक्षण द्या पण सरसकट नको अशी भूमिका महासंघाने घेतली आहे.
हेही वाचा…“एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या”, अजित पवारांनी दिले जात जनगणना करण्याचे संकेत
दरम्यान, ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा येईल, तेव्हा रस्त्यावर उतरू आणि मराठा आंदोलनापेक्षाही मोठं आंदोलन राज्यात करू. असा इशारा ओबीस महासंघाने दिला आहे. त्यामुळे आता उद्या दसऱ्याच्या दिवशी राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार ? त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दिवाळी आधी राज्यातील राजकीय वातावरण बिघडू शकतं”, बड्या नेत्यानी व्यक्त केलं भाकित
हेही वाचा…मराठवाड्यात आघाडीच्या जागा वाटपाचा फॉम्युला ठरला? लोकसभा निवडणुकीत तगडे उमेदवार देणार
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र सुनावणीचे नवे वेळापत्रक दसऱ्यानंतर, नार्वेकर करणार पुन्हा दिल्लीवारी
हेही वाचा…जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार, मराठा आरक्षण देण्याबाबत फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“ललित पाटीलचा एन्काऊंटर करून प्रकरणाचा तपास थांबवला जाईल,” आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप