मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, यानंतर ईडीकडून देशमुखांच्या भोवती फास आवळला जात आहे.
योगायोग की…? फडणवीस आणि अजित पवारांनी दिला वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हा एकच संदेश
त्यांच्या नागपूरच्या आणि मुंबईच्या घरांवर छापे मारण्यात आले. ईडीकडून त्यांना तीन समन्स बजावण्यात आले. त्यांच्या दोन्ही मुलांना आणि त्यांच्या पत्नीलाही समन्स बजावण्यात आले. याला अनिल देशमुखांकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही आणि नंतर ईडीने त्यांच्या ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर टाच आणली. मात्र, आता त्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे कळते आहे.
काँग्रेसने परत छेडले शिवसेनेला? पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली की स्तुती?
दरम्यान, आता पुन्हा एकदा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला आणि तपासणी केली. मात्र, तेव्हापासून अनिल देशमुख गायब झाले असून, त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात होते. यांनतर आज देशमुखांनी एक व्हिडीओ तयार करून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यात त्यांनी ईडीसमोर कधी जाणार हे स्पष्ट केलं आहे.
Enforcement Directorate has seized my properties worth Rs 4 crores, including my son's property worth Rs 2.60 crores. I have received an ED summon and have filed a petition in SC. After verdict, I will record my statement to ED: Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/uRRxcDoJ0r
— ANI (@ANI) July 19, 2021
एकनाथ खडसेंना मोठा धक्का! जावयावर ईडीने केली मोठी कारवाई
यात त्यांनी, “ईडीने कुटूंबाची ४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली असून, त्यात माझ्या मुलाने २००६ मध्ये २ कोटी ६७ लाखांत खरेदी केलेल्या जमिनीचाही समावेश आहे. मात्र, माध्यमांमध्ये ही जमीन ३०० कोटींची असल्याचे दाखविले जात असून, त्यामुळे गैरसमज पसरत आहे. ही जमीन २ कोटी ६७ लाख रुपयांचीच आहे. आता मी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल, त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझे म्हणणे मांडायला जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- मोदींनी मन जिंकले : भर पावसात स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले
- का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
- फडणवीसांचा खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
- मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, आशिष शेलार म्हणतात…
- उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न