नागपुर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांवरून काल विधानसभेत मोठा राडा झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिकांवरील भूमिका मांडण्याची सरकारला विनंती केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आक्रमक भूमिका घेतली. यातच विरोधकांच्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, असं म्हणत अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं, अन्.., ट्विटरवर चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे एकमेकांत भिडल्या
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
हेही वाचा…“देवेंद्र भाऊ सरडा सुद्धा बघून आत्महत्या करेल हो..!” संजय राठोड, नवाब मलिक प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला
आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत.राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकाऱ्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे. असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच नवाब मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी त्यावर बोलेन असं अजित पवारांनी म्हटलंय. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राचं काय कारायचं ते मी करेन. असंही ते म्हणाले.
दरम्यान, नवाब मलिक हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाही तर संपुर्ण महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप अजून सिद्ध झाले नाही. ते जामीनावर आहेत. मी नेहमी सत्याच्या बाजून असते. नवाब भाईंवर आरोप झाले आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर
हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“विरोधकांच्या मिरच्या भाजपला झोंबल्या, नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, थेट फडणवीसांचं अजितदादांना पत्र
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार, कार्यक्रम जाहीर