पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कंपनी गेल्या काही दिवसापासून ईडीच्या रडारवर आली आहे. यासंदर्भात ईडीने रोहित पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याच अनुषंगाने रोहित पवारांची उद्या इडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांची इडी चौकशी होईपर्यंत शरद पवार पक्ष कार्यालयात बसून राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
हेही वाचा…“पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब”, शरद पवार गटाचा मोठा आरोप
रोहित दादांबरोबर उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब हे सर्व ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. आमचा दादा हा लढणारा दादा आहे तो पळणारा दादा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारा आहे, ज्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवता आला नाही ते पळून गेले, ते पळकुटे होते आणि जे लढत आहेत त्यांच्यासोबत या महाराष्ट्रातील सर्वोच्च नेता आदरणीय पवार साहेब स्वतः हाताला हात धरून ईडीच्या कार्यालयापर्यंत येणार आहेत. असं शरद पवार गटातील ओबीसी सेल राज्यप्रमुख राज राजापुरकर यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील युवकांच्या प्रश्नांना घेऊन युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. युवकांना रोजगार मिळायला हवा आणि त्यासाठी मी जर लढत असेल तर मी हा गुन्हा वारंवार करेल १०० वेळा करेल, मग ईडी काय कोणतीही यंत्रणा आली तरी हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या युवकांसाठी आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी मी लढणार हे आमदार रोहित दादा पवार यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा…नितेश राणेंच चिथावणीखोर ट्विट अन् मीरा रोडवर वाढवला पोलिसांचा मोठा फौजफाटा
नागपूरला समारोप सभा झाली तेव्हा रोहित दादांनी सरकारला आव्हान केले होते की, सरकारकडून एखादा प्रतिनिधी यावा आणि आमचे निवेदन स्वीकारावे पण हे स्वीकारले गेले नाही. याउलट मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला त्यात अनेक कार्यकर्त्यांना दुखापत झाली. आदरणीय पवार साहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवत रोहित दादा पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण, महिला आणि कार्यकर्ते इथे येत आहेत. असेही त्यांनी सांगितले.
अजित दादा पवार स्वतः म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई होत असेल तर ६४ साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहाराचे काय ? मात्र आता ते भाजपासोबत गेल्यामुळे त्यांच्या बाबतीत झालेले सर्व गैरव्यवहार हे कागदाच्या आड लपले गेले. तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की, आपण येत आहात तर आपण आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षितता बाळगावी पक्ष आपल्यासोबत खंबीरपणे पाठीशी उभा आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हेही वाचा…“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार”?
हेही वाचा…“धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा, पुरावे आम्ही देतो,” शरद पवार गटाने कसली कंबर
हेही वाचा…“ज्यांच्या विरोधात निवडणुक लढविली, आता त्यांनाच उमेदवारी देण्याचा भाजपचा नवा डाव”
हेही वाचा…उल्हास पाटिल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत, माजी खासदार उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले..