पुणे : भारतासह जगभरातील ४० देशांची सरकारांनी, राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर केला असल्याचे, ‘द वायर’ या वेबाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. यात इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या ‘पेगॅसस’ या हॅकिंग सॉफ्टवेअर द्वारे भारतातील पत्रकार, नेते, न्यायाधीश आणि उद्योगपतींचे फोन हॅक केल्याचं वृत्त, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांत सुरु आहे.
या मंत्र्यांना डच्चू, तर या मंत्र्यांना मिळू शकते संधी; लवकरच राज्य मंत्रिमंडळातही फेरबदलाचे संकेत
या पार्श्वभूमीवर आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० भारतीयांची केंद्र सरकारने जासूसी केल्याचा आरोप, विरोधकांनी मोदी सरकारवर केला असून, हॅकिंगद्वारे या सर्वांवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ३०० मध्ये ४० पेक्षा जास्त पेशाने पत्रकार असून, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
नामनियुक्त सदस्यांची नेमणूक करणे, राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य -उच्च न्यायालय
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून एक पत्रक काढले गेले असून, त्यात केंद्राकडून देशाच्या पवित्र संविधानाचा अनादर केला गेला आहे, ही बाब गांभीर असून पक्षाकडून याचा निषेध करण्यात आला आहे.
काय आहे पत्रकात…
पक्षाच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की , विदेशातील एका खाजगी कंपनीचे “Pegasus” नावाचे सॉफ्टवेअर वापरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, देशाचे निवडणूक आयुक्त, विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सरकारमधील मंत्री तसेच अनेक पत्रकारांवर पळत ठेवून केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकशाहीच्या चारही स्तंभांना सुरुंग लावला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता या देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून केंद्रातील हुकूमशाही सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाचा अवमान केला असून ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे.
‘सामाना’तल्या फटकेबाजीवरून संजय राऊत-नाना पटोलेंमध्ये तुंबळ वाक्युद्ध
या गोष्टीचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अघ्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून, आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे ही विनंती. या आंदोलनाचे ठिकाण, गांधी भवन, कोथरूड ठेवण्यात आले असून, २१ जुलैला दुपारी २ वाजता हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
काय आहे ‘पेगॅसस’? सामान्यांसाठी उपलब्ध आहे का?
हे सॉफ्टवेअर फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. सामान्य नागरिकांना ते वापरण्यासाठी उपलब्ध नाही.
कसं काम करतं ‘पेगासस’?
ज्या व्यक्तीच्या फोनला हॅक करायचं आहे. त्या व्यक्तीच्या फोनमध्ये ‘पेगासस’ इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. यात जास्त करून, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. आणि जसं त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, सॉफ्टवेअर आपोआप इन्स्टॉल होतं.
व्हॉटस अपमध्येही इन्स्टॉल होतं?
हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन २०१९ मध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होत. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक बग शोधून काढून, त्याच्या आधारे नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. आणि एका कोडद्वारे या सॉफ्टवेअरला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.
पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं?
पेगासस इन्स्टॉल केल्यावर हॅकर्स, तुमच्या फोनला कमांड देऊन, फोनचं नियंत्रण मिळवतात आणि हवी ती माहिती मिळवतात. यात अनेक खाजगी गोष्टी असू शकतात. जसे की पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज इ. तसेच, ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात, फोनचा कॅमेरा, माईक वाटेल तेव्हा चालू करु शकतात.
पेगासस एवढं फेमस का आहे?
- कमी बँडविथवर काम करु शकतो. फोनची बॅटरी खात नाही. मेमरी, त्यातला डेटा संपवत नाही, त्यामुळे विनासंशय फोन हॅक होतो.
- अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित. iOS लाही हॅक करु शकतो.
- फोन लॉकचा फरक पडत नाही.
Read Also :
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
- धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
- “काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
- का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात