मुंबई : एसटी विलगीकरणाच्या मागणीसाठी राज्यात अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर अनेकवेळा बैठका देखील पार पडल्या, पंरतु त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना 10 मार्चपर्यंत कामावर येण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरून देखील राज्यात राजकीय वाद-प्रतिवाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावरून सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्राचं वैभव असलेल्या लालपरीतून खेड्यापाड्यातील जनता, शेतकरी, विद्यार्थी दररोज प्रवास करतात. हा प्रश्न सुटावा असं आमचं मत आहे. परंतु सरकारला काही करायचं नाही. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना युक्रेनमधील विद्यार्थ्यांची चिंता लागली आहे. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थी शाळेत पोहोचत नाहीत त्याची ससेहोलपट होत आहे. त्यांची चिंता यांना का नाही ? तिकडे विमानं सोडा म्हणता, इकडे एसट्या सोडा ना. हे सरकार दुटप्पी भूमिकेने वागत आहे, असं ते म्हणाले.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, आम्ही आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी आझाद मैदानात बसणार नाही. तर आता थेट अनिल परब यांच्या बंगल्यासमोरच आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं चित्र निर्माण करायचं आणि दुसरीकडे त्यांना बाबू म्हणून गोपनीयतेचं पत्र का? आता जर कामगारांना बांबू लावणार असाल तर तुम्हीलाही बांबू लावू, असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार दिला आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
एसटी विलगीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून एसटी बंद आहे. सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत अनेक बैठका पार पडल्या, मात्र यावर अद्यापही उपाय शोधता आलं नाही.
Read also:
- ठाकरे सरकारकडून राज्यपालांना टार्गेट केले जात आहे; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
- संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यापासून त्यांची ओळख, नाही तर…; गिरीश महाजनांचा टोला
- मध्यप्रदेशमधील प्रकरण टिकतयं तर, आमचंही प्रकरण टिकेल; वडेट्टीवारांची ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…