मुंबई : कथित साई रिसोर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळीच ईडीचं पथक सदानंद घरी यांच्या घरी पोहचलं अन् त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात आहे. त्यामुळे अनिल परब यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील
सदानंद कदम यांना ईडीने अटक केल्याचा दावा भाजपनेते किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच अब क्या होगा, अनिल परब तेरा, असं म्हणत त्यांनी अनिल परब यांनाही इशारा दिला आहे. मागील काही वर्षापासून साई रिसोर्ट प्रकरणी सोमय्या सातत्याने आरोप करीत होते. मागील काही दिवसापूर्वी अनिल परब यांच्या घर आणि
ऑफिसवर एकाच वेळी कारवाई झाली होती. त्यामुळे ह्या कारवाईकडेही सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा..“जनार्धन यांच्यासोबत नाही, म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली”, मुंडेंनी फडणवीसांना डिवचलं
दरम्यान, विरोधी पक्षाच्या विरोधात भाजप हा राजकीय दृष्टीने काम करीत आहेत. त्यामुळे आमच्या लोकांवर जाणीवपुर्वक कारवाई केली जात आहे आणि ही कारवाई पक्षापातीपणाची आहे. ईडीच्या कारवाया ह्या पक्षपातीपणाच्या आहेत. भाजप नेते ज्या ज्या लोकांवर आरोप करीत आहेत. त्या लोकांवर ईडीची कारवाई होते. अशी टिका अंबादास दानवे यांनी केली.
Read also
- हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा
- हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका
- हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा
- हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार