पुणे : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांकडे राज्य सरकारने काढलेला जीआर घेऊन पोहचला, परंतु मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम राहिलेत. यातच सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार असेल तरच द्यावे, अन्यथा ती समाजाची फसवणूक ठरेल. अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”
मराठा आरक्षण देतांना मनोज जरांगे पाटलांची तब्येत महत्वाची आहे. त्यांच्या पाठीशी सर्व मराठा समाज आहे. पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांच्या नंतर मराठा समाजासाठी 2007 पासून यासाठी मी देखील लढा देत आहे. याचा वारंवार मला अनुभव आला आहे. त्यावेळी मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं नाही. यानंतर अनेक लढे दिले. यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांना आरक्षणासाठी पत्र दिलं होतं. त्यावेळी आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्गीय आयोग पुन्हा गठित करावं लागेल असं त्यावेळी बोललं होतो. जस्टीस गायकवाड यांनी जो अहवाल दिला होता. त्यात सर्व काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. सरकारला जर खरचं इच्छा असेल तर तो अहवाल त्यांनी परत एकदा वाचावा, असं संभाजी राजे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका
दरम्यान, मराठा समाज हा पुढारलेला वर्ग असून तो मागासवर्गीय नाही, तर त्यांना आरक्षण कसं काय देऊ शकतात ? असा सवाल देखील संभाजी राजे यांनी सरकारला केला आहे. गायकवाड अहवालाबाबत न्यायमुर्ती भोसले समितीने देखील शिफारस केली होती. तो अहवाल त्यांना चांगला सांगितला असून त्यात त्यांनी दोन तीन गोष्टी अॅड केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचा असेल तर सरकराने मागासवर्गीय आयोग पुन्हा गठित करणं गरजेचं आहे. असंही संभाजी राजे यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका