मुंबई : ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांच्याबाबत तुम्ही द्वेष पूर्ण बोलायला नकोय. आम्हालाही स्वाभिमान आहे. पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. तर संपुर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही. त्याबाबत संवेदनशील असलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने सावत्रपणाची वागणूक मिळते. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धव ठाकरे आणि ममती बॅनर्जी यांनी आवाज उठवला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामानातून भाजपचा समाचार घेतला.
“शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
भोंग्याबाबत जी सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे, तीच भूमिका राज्य सरकारची आहे. महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आलं आहे. भोंग्याचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही राजकीय भोंगेबाजी असून आता योगी कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन अचानक कसं झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने यावर पीएचडी करायला हवी, असा टोला देखील त्यांनी लगावला.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
उत्तर प्रदेशाती सरकारने भोंग्याबाबत काही निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं पालनं करण्यासाठीचा हा निर्णय आहे. गृहमंत्र्यांनी सर्वांना बोलावलं आहे. परंतु भाजपने बैठकीवर बहिष्कार टाकला. याचा अर्थ तुम्ही राजकारण करत आहात. तुम्हाला महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे. तुमची मर्जी लाऊडस्पीकरबाबत एक राष्ट्रीय धोरण तयार केलं पाहिजे. ते लागू व्हावं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याचं पालनं झालं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
दरम्यान, अलिकडेच कोरोना आढावा आणि देशातील सध्य स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांना इंधन दरवाढ, महागाई इत्यादीबाबत टोमणे मारले. त्यावरून संजय राऊत यांनी सामानातून आज त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देखील त्यांनी भाष्य़ केलं.
Read also:
- अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
- ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
- “भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकारायचं असेल तर..;” रोहित पवारांचा भाजपला सल्ला
- “आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
- “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी योगींचं अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी”; मनिषा कायंदे