ठाणे : आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मला केव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका होईपर्यंत मला ते तुरूंगात ठेवतील. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तयारी करीत असल्याची माहिती मला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे.
“आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांची ‘निर्मल’ आशा धुळीस मिळाली”; जितेंद्र आव्हाड
मागिल काही दिवसांपासून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादीचा म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या भागातून राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक बंड करणार असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. त्यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात एकमेकांवरून चांगलीच अलिकडे बॅनरबाजी झाली होती. यातच जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या दाव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटलं आहे.
“महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”
हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकमुळे आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना अजून एका प्रकरणात अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं होतं. तशापासून जितेंद्र आव्हाड हे सातत्याने राज्य सरकारवर टिका करतांना दिसत आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अनेक गोष्टी करतांना दिसत आहेत.
Read also
- उमेदवारांच्या याद्या, तयारीही जोरात, फक्त राज ठाकरेंचा आदेश..! कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसे मैदानात
- हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर..! मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बॅंकवर ईडीचा छापा
- “कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा रंगला कट्टा”, सर्वपक्षीय नेत्यांचा मतदारसंघावर दावा
- कसबा पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच..! इच्छुक उमेदवारांची नावं जाहीर
- “सुनील शेळकेंना भेटून, योग्य तो निर्णय घेऊ”, अजित पवारांचं शेळकेंबाबत मोठं वक्तव्य