अहमदनगर : कर्जत जामखेड या परिसरातील दुष्काळाचे दुखणे फार जुने आहे. उद्योगाचा प्रश्न सुटलेला नाही. मला आनंद एका गोष्टीचा आहे की इथल्या जनतेने निवडणुकीमध्ये रोहीतसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने निवडून दिले. त्याच्या हातामध्ये कामाची संधी दिली. मागील दोन अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे अशी झाली आहेत ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पर्श दिसावा. अस मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहेत. ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेळी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे उपस्थितांसमोर ते बोलत होते.
तीन महिलांची आठवण देशात ठिकठिकाणी काढली जाते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर. जिजामातेने शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध लढायला एक आत्मविश्वास दिला. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे मुलींसाठी खुले केले आणि अहिल्यादेवींनी एक वेगळे काम केले ते काम म्हणजे कौटुंबिक संकट आल्यानंतर सुद्धा राज्यशकट हातामध्ये घेत त्यांनी प्रशासनाच्या संदर्भातील एक आदर्श देशासमोर ठेवला. समाजामधील चुकीच्या प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, हुंडाबंदीमध्ये लक्ष घातले, विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी निर्णय घेतले, कन्यादानाच्या संदर्भातील निर्णय घेतला. सर्व जातीधर्मातील लोकांना घेऊन राज्य चालवण्यासाठी सर्वधर्मसमभावाची संकल्पना त्यांनी कृतीमध्ये आणली.
“दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
आज अहिल्यादेवींचे स्मरण करताना तुमच्या तरूण आमदाराने इथे उद्योग वाढावेत यासाठी इथे एमआयडीसी कशी होईल याकरता उद्योग मंत्र्यांसोबतही बैठका घेतल्या, जमिनीची निवड केली आणि या भागात एमआयडीसी येईल, कारखाने उभे राहतील याची पूर्ण तयारी याठिकाणी केली आहे. अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत दळणवळणाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले. अनेक ठिकाणचे रस्ते केले. मी बघतोय की रोहीतने जबाबदारी घेतल्यानंतर दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग या भागासाठी मंजूर झाले. त्यांच्या कामाची प्रत्यक्षपणाने सुरुवात झाली. त्यामुळे रस्ते, पाणी वा रोजगार असो, हा दृष्टीकोन जो अहिल्यादेवींनी ठेवला होता, आज नेमके तेच सूत्र नजरेपुढे ठेवून तुमचा आमदार या भागामध्ये काम करतोय याचा मला मनापासून आनंद आहे. असंही ते म्हणालेत.
दरम्यान, प्रशासनाचा अधिकार आल्यानंतर ते प्रशासन कसे चालवायचे याचा आदर्श अहिल्यादेवींनी संपूर्ण देशासमोर ठेवला. सावित्रीबाईंचे काम एका वेगळ्या दिशेने होते. जिजामातेचे काम वेगळ्या पद्धतीचे होते आणि अहिल्यादेवींचे काम हे सर्वसमावेशक अशा प्रकारचे होते. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारे होते. आज अहिल्यादेवींच्या जयंतीचा दिवस हा देशातील स्त्री वर्गाचा सन्मान करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांचा अधिकार वाढवणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून याठिकाणी होतोय याचे मला मनापासून समाधान आहे. हा सर्व भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे.
Read also:
- राजकारणात हातखंड असणाऱ्या वडिलांच्या छत्रछायेत वाढलेल्या राजकीय लेकींची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल का?
- “चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
- मुंबई वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वॉर्ड गमवला, भाजपला फायदा
- केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा; राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- “फडणवीससाहेब तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा; एकाला तुकडा मिळलाय दुसरा वणवण फिरतोय”