पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लागली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड या पोटनिवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या पोटनिवडणुकांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचाराला ४८ तास शिल्लक असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांनी यासाठी हिरीरीने यात सहभाग घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी रॅली काढत प्रचार केला आहे. काल चिंचवडमध्ये झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…“शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”
चिंचवड पोटनिवडणुक लागली नसती तर अधिक आनंद झाला असता. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सावलीसारखे काम अश्विनीताईंनी केेले आहे. आज त्यामुळेच संपुर्ण ताकदीने जनता त्यांच्या बाजूने उभी आहे. पुणे हे अतिशय गतीने होणार शहर असून , या शहरात आयटी, शिक्षण, नागरी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या वेगाने प्रगती पुण्याने केली. शहरीकरण हा कायमच अभिशाप समजला गेला. पम शहरीकरण हा शाप नाही, तर विकासाच्या नव्या संधी आहेत. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आणि ते पंतप्रधान झाल्यापासून शहर विकासाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शहरांसाठी योजनांचा काळ सुरू झाला. अमृत, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अशा अनेक योजनांची आखणी झाली. त्यासाठी निधी देणे प्रारंभ झाले. असं म्हणत पुढे ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आंध्र धरणाचे काम सुरू केले. या प्रकल्पातून नागरिकांना २५० एमएलडी पाणी मिळणार आहे. कचरा प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन यावर सुद्धा काम सुरू आहे. शहर वाहतूक, मेट्रो अशा प्रकल्पांवर काम सुरू आहे. शहरे ही नागरिकांना सुखात्मक करण्याचा आमचा प्रयत्न असून तो आता पुर्ण होत असल्याचंही फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड मतदार संघातील समस्यांवरही भाष्य केलं. सध्या विविध मेट्रोंच काम सुरू आहे. ती एकात्मिक प्रणालीवर आल्यावर त्याचा मोठा लाभ नागरिकांना होणार आहे. पुणे रिंगरोडचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तो मल्टीमॉडल कॉरिडॉर असेल. वाहतुक कोंडीवर हा रामबाण उपाय असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या दिशेने त्याच दिशेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी चालतो आहे. चिंचवडचा लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच दिशेने चालणारा हवा. आमचे व्हीजन भाषणापुरते नाही, तर प्रत्यक्ष कृतीत साकारणारे आम्ही आहोत. असंही त्यांनी स्पष्ट केले.
Read also
- गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा ; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
- हेही वाचा…पुण्यातल्या एमपीएसच्या आंदोलनाला यश, पण आता भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवादीची लढाई
- हेही वाचा.“हेमंत रासनेंसाठी फडणवीस तर काटेंसाठी अजित पवारांची रॅली”,पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला
- हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका
- हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर