मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्याचे दिसून आलं. यावरून विरोधकांनी राज्य सरकारसह भाजपवर जोरदार टिका सुरू केली आहे. यातच महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातले गेले म्हणून काय बिघडलंय. गुजरात काय पाकिस्तान नाही असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यावर खोचक टिका केली आहे.
हेही वाचा…आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातले गेले म्हणून काय बिघडलंय, गुजरात काय पाकिस्तान नाही हे म्हणजे महाराष्टाची भाकरी आणि गुजरातची चाकरी असे आहे. भाजपला आणखी एक संधी म्हणजे महाराष्ट्राचं सर्व अर्थकारण गुजरातला रवाना. फडणवीसांना गुजरात इतकेच आवडत असेल तर त्यांनी गुजरातमध्ये मी आता येईनच या नव्या घोषणा देऊन स्वत: चा प्रचार करावा, असा शाब्दिक हल्लाबोल ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलाय.
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार
दरम्यान, राज्यात महायुती सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात राज्यात गेले. परंतु याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला अद्यापही दिसून येत नाही. यावरून महाविकास आघाडी सातत्याने भाजपवर टिका करतांना दिसत आहे.
READ ALSO :
पुण्यात लोकसभेसाठी भाजपात स्पर्धा वाढली, मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका कोणी लावला ?
हेही वाचा…“अजित पवार गटाचा उडाला गोंधळ,” शरद पवारांनी डिचवल्याने अजित पवार गटाला ‘ते’ ट्विट करावा लागलं डिलीट
हेही वाचा…“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं
हेही वाचा…कमळावर की धनुष्यबाणावर निवडणुक लढणार ? श्रीरंग बारणेंनी स्पष्ट सांगितले
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा