बुलढाणा : बहुचर्चित काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो सध्या महाराष्ट्रातून जात आहे. दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. राहुल गांधी यांची अलिकडेच नांदेड येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सभेला हजेरी लावली. अशातच राहुल गांधी यांची 18 नोव्हेंबर देखील शेगाव येथे सभा होत असून या सभेला महारविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
“त्यांनी मला हात लावला, तेव्हा जी फिलिंग आली, ती…”; पीडित महिलेचा आव्हांडावर धक्कादायक आरोप
राज्यात महाविकास आघाडीसोबतच राज्यातील राजकीय संघटनांनी देखील भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जंयत पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील या यात्रेत पायी चालून सहभाग नोंदवला. त्याचबरोबर शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील राहुल गांधी यांच्या सभेत पायी यात्रा केली.
“जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती
याचबरोबर आता राहुल गांधी यांची 18 नोव्हेंबर रोजी शेगाव याठिकाणी सभा होणार आहे. या सभेत काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांंधी ह्या देखील सहभागी होणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वात मोठी सभा शेगाव याठिकाणी होण्याची शक्यता आहे.
“आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
दरम्यान, शेगाव याठिकाणी होणाऱ्या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. जवळपास 25 एकर मध्ये ही सभा होणार असून जवळपास 8 लाख लोक सभेला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची यात्रा 19 नोव्हेंबरला मध्यप्रदेशमध्ये प्रस्थान करेल. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा जम्मू काश्मीर मधील श्रीनगर याठिकाणी जाणार आहे. जवळपास 100 दिवस आणि 3 हजार पेक्षा जास्त किलो मिटरचा प्रवास राहुल गांधी पायी चालणार आहे.
Read also
- “माझ्या खुनाचा कट रचला गेला असला तरी मला चालललं असतं”
- “राजकीय परिस्थिती पाहता राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागणार का ?” अजित पवार म्हणाले, जोपर्यंत..;
- “आम्ही कोणत्याही राजकीय सुडापोटी कारवाई केली नाही”; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
- “शरद पवारांनी आव्हाडांना पक्षातून निलंबित करावं”; भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
- “शाळेत माझ्या मुलीला पण विचारलं की, तुझ्या वडिलांनी..;” अन् जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात पाणी