मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांचं राज्यात सरकार आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी देखील बघायला मिळत आहेत. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागणार असल्याचं सुचक वक्तव्य केलं. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या संपुर्ण राजकीय घडामोडीनंतर राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात कोणचंही सरकार असेल तर त्याला 145 आमदारांचा पाठिंबा लागतो. त्यामुळे 145 आमदार जोपर्यंत सोबत आहेत. तोपर्यंत सरकार राहतं. संजय राऊतांनी केलेले वक्तव्य कोणत्या आधारवर केलं आहे. ते त्यांना विचारणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
दरम्यान, संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यामुळे यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा काहीच दोष दिसत नाही. परंतु एखाद्या लोकप्रतिनीधीला अशा प्रकारच्या गुन्हात अडकावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते योग्य नाही. सरकार येत असतं सरकार जात असतं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं अजित पवार म्हणाले.
“शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण हे वेगळ्याच पातळीवर निघून गेले आहे. राज्यातील इतर मुद्दे हटवण्यासाठी राज्य सरकार जाणूनबूजून अशा पद्धतीच्या गोष्टी करीत आहेत की काय?असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. कारण मागील काही दिवसांचा विचार केला तर याच मुद्दावर सध्या चर्चा केली जात आहे.
Read also
- “आम्ही कोणत्याही राजकीय सुडापोटी कारवाई केली नाही”; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
- “शरद पवारांनी आव्हाडांना पक्षातून निलंबित करावं”; भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
- “शाळेत माझ्या मुलीला पण विचारलं की, तुझ्या वडिलांनी..;” अन् जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात पाणी
- “त्यांनी मला हात लावला, तेव्हा जी फिलिंग आली, ती…”; पीडित महिलेचा आव्हांडावर धक्कादायक आरोप
- “जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती