मुंबई : भाजपच्या महिला पदाधिकारीनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यासंपुर्ण प्रकरणानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर राज्यातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यावर बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. पंरतु, या प्रकरणात पोलीस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलीस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही. असंही ते म्हणाले.
“शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
आज संपुर्ण दिवसभरात जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्यासोबत आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याआधी संबंधित महिलेने सकाळी पत्रकार परिषद घेऊन झालेली घटना सांगून दाखविली. त्यामुळे सध्या राज्यात जोरदार राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
“लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण हे वेगळ्याच पातळीवर निघून गेले आहे. राज्यातील इतर मुद्दे हटवण्यासाठी राज्य सरकार जाणूनबूजून अशा पद्धतीच्या गोष्टी करीत आहेत की काय?असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. कारण मागील काही दिवसांचा विचार केला तर याच मुद्दावर सध्या चर्चा केली जात आहे.
Read also
- “शरद पवारांनी आव्हाडांना पक्षातून निलंबित करावं”; भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
- “शाळेत माझ्या मुलीला पण विचारलं की, तुझ्या वडिलांनी..;” अन् जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात पाणी
- “त्यांनी मला हात लावला, तेव्हा जी फिलिंग आली, ती…”; पीडित महिलेचा आव्हांडावर धक्कादायक आरोप
- “जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती
- “आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले