मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका थांबुन राहिल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा पेच अजूनही राज्य सरकारला सुटलेला नाही आहे. अशातच आता मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. याचाच धागा पकडत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी राज्य सरकारव घणाघाती टिका केली आहे. ते भाजपच्या कार्यकारणी सभेत बोलत होते.
“सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले;
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 13 नोव्हेंबर 2019 रोजी ट्रिपल टेस्ट कराण्यासाठी सांगितली. 4 मार्च 2021 पर्यंत सरकारने फक्त टाईमपास केला. 8 वेळा तारखा घेतल्या. त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात लिहिलं की सरकारला काही करायचं नाही. त्यामुळे आम्ही तारीख का द्यायची. त्यामुळे त्यांनी ओबीसी आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही आजपर्यंत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाहीत. अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ?
सर्वाच्च न्यायालयाचा पहिला फटका मध्यप्रदेश सरकारला बसला. त्यामुळेच त्यांनी इम्पेरिकल डेटा तयार केला म्हणून त्यांना आता सर्वोच्च न्यायलायने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळेच मी म्हणतो की ओबीसी आरक्षण जाणे हे या सरकारचं पाप आहे. कारण एकवर्षाआधी महाराष्ट्र इम्पेरिकल डेटा तयार करू शकले असते. पंरतु त्यांच्या मनात पाप होतं. ओबीसी आरक्षणाचे हत्यारे हे सरकार आहे. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे. श्वास आहे. हे षड़यंत्र आहे. आता शांत बसलो तर ओबीसी आरक्षण कधीच मिळणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
इडा पिडा टळो, अन् इडीचा ससेमिरा मरो; भावना गवळी यांच्यासाठी शिवसेनेकडून यज्ञ
दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणामुळे महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, ग्रामपंचायती यांच्या निवडणुकां थांबून राहिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यातील राजकीय नेत्यांची भूमिका ही ओबीसी आरक्षणा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. अशी भूमिका घेतली आहे.
Read also:
- “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले