पुणे : महात्मा गांधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी भिडे टिकेची धनी झाले आहेत. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांना तुरूंगात टाकलं पाहिजे. अशी मागणी काॅंग्रेसच्या नेत्यांसह राज्यातील विरोधकांनी केली आहे. तर याप्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतली असून गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा फुले तसेच लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मनोहर भिडे यांनी केलेली वक्तव निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपित्याचा अवमान करणे तसेच त्यांच्या मातोश्रींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत जाहीरपणे आक्षेपार्ह भाष्य करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं
दरम्यान, वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या विधानाचा विपर्यास केला असं म्हणून भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही हे चुकीचे आहे. महात्मा गांधींचा देश हीच भारताची जगभरातील ओळख आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे. राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“RSS त्या ६१ हजार संस्थांशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी जाहीर करावं,” आंबेडकरानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतुकीत बदल, कसा असणार पुणे दौरा ?
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक