मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांकडून ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे, आजच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले. आज, मागच्या वर्षीसारखी यावर्षीही भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक, ऑनलाईन पद्धतीनं झाली. या राज्यव्यापी बैठकीसाठी विविध जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारीही जोडले गेले होते.
हे पण वाचा, भाजपाला कधीपासून ओबीसींचा कळवळा? जेव्हा त्यांचे नेतृत्व संपवले तेव्हा हा कळवळा कुठे होता?
तसेच, मुंबईत व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, तसेच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. भाजपचे प्रदेश प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी बंगळुरु येथून बैठकीत सहभागी झाले होते. तसेच सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे आणि जयभानसिंह पवैय्या ऑनलाईन सहभागी झाले होते.
हे पण वाचा, “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
यावेळी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना, “राज्यातील आघाडी सरकारला नागरिकांची चिंता नाही. त्यांना, सत्ता किती काळ तग धरेल, याचाच भरवसा नसल्याने त्यांचा सगळा भर कमाई करण्यावर आहे, याचमुळे राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे,” अशी हल्लबोल केला आहे.
हे पण वाचा, परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
“नेत्यांना खात्री नाही हे सरकार किती टिकेल, त्यामुळे सातत्याने त्यांच्याकडून ५ वर्षाचा घोष चालू आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मराठ्यांचे, ओबीसींचे आरक्षण गेले आणि आता नेते कोडगेपणाने सगळं काही केंद्रावर ढकलत आहेत, यांनी खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- “अनेकजण अनेक रंग दाखवत आहेत, पण तो बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये आहे”
- “फडणवीसांनी आरक्षणाचं श्रेय घ्यावं आणि आंदोलनाचं नेतृत्व करावं, मात्र…” भुजबळांनी केली विंनती
- कोरोनाची तिसरी लाट: घाई घाई ने निर्बंध शिथिल करू नका – उद्धव ठाकरे
- पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कडून स्थगिती
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य