मुंबई : देशात अलिकडेच घडलेल्या मणिपूरच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मीडीया समोर येऊन दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं. यातच आता पश्चिम बंगालमध्ये देखील अशीच एक घटना घडली. यावरून आता राज्यातील भाजपच्या नेत्यांनी विरोधकांवर टिका केली. तर त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक
मणिपूरमध्ये जे घडलंय ते संतापजनकच आहे. त्याचा सर्वस्तरातून जळजळीत निषेधही होतो आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये तेच घडलंय. सत्ताधारी पक्षाने घडवलेले आहे. त्याबद्दल मौन कशाला बाळगले जातं आहे. ? कि तिथल्या महिलांची अब्रू ही अब्रू नसते ? भाजपाशाषित राज्यात अत्याचार झाले तरच बोलायचे हा फक्त दुटप्पीपणा नाही, ही विकृती आहे. असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन
दरम्यान, भाजप शासित नसलेल्या राज्यात तुम्ही व्यवस्था लावण्यात तत्पर आहातच. बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी केंद्रीय पोलीस बळ लावले जाणे तुमच्या तथाकथित काळजीचे उत्तम उदाहरण आहे. मणिपूरबाबत मात्र तुम्ही किती तत्पर आहात. हे त्या महिलांचा व्हिडीओ किती दिवसांनी बाहेर आला. हे जगाने पाहिलं. मुद्दा हाच आहे, की भाजपशासित मणिपूर राज्यात सगळं ऑल इज वेल आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न फसला आहे. असं अंबादास दानवेंनी म्हटलं.
अहो, @BhatkhalkarA भाजप शासित नसलेल्या राज्यात तुम्ही व्यवस्था लावण्यात ‘तत्पर’ आहातच. बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी केंद्रीय पोलीस बळ लावले जाणे तुमच्या ‘तथाकथित’ काळजीचे उत्तम उदाहरण आहे. मणिपूरबाबत मात्र तुम्ही किती तत्पर आहात, हे त्या महिलांचा व्हिडियो किती… https://t.co/UqICOapjio
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..तर महाराष्ट्रांच्या गल्ल्यांमध्ये कोण फिरणार ?”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या यांच्या हस्ते कोथरुडच्या ‘त्या’ जिगरबाज पोलिसांचा सत्कार
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारासमोरच शिंदे गटातील आमदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले, “आमची मैत्री कायम..”,
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चौथी भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’