मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री वादग्रस्त ठरले आहेत. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नऊ शिंदे गटाचे तर भाजपचे ९ असे एकूण १८ मंत्र्यांना कॅबिनेट पदाची शपथ दिली. मात्र यात शिंदे गटातील पाच मंत्री विविध मुद्यांवरून अडचणीत आले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. असं म्हटलं आहे.
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिणीचे राजकारणात पुन्हा सुर जुळले, पंकजा मुंडे अध्यक्षपदी, तर धनंजय मुंडे….
एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वारंवार कराव्या लागत आहेत. त्यामागे अमित शहा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये संजय राठोड, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत या मंत्र्यांना आवर घाला किंवा यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही मंत्री मंडळाचा विस्तार करणार नाही. असं अमित शहा यांनी सांगितलं असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रात जातात. जोपर्यंत या पाच मंत्र्यांची एकनाथ शिंदे हकालपट्टी करत नाही. तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. अब्दुल सत्तारबद्दल केंद्रांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सत्तार यांच्यामुळे भाजपची प्रतिमा पण डागाळली गेली आहे. परवा गिरीश महाजन यांनी एक विधान केलं होतं की १० मंत्री पद आम्ही देऊ आणि त्यामध्ये तो अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. तसेच ज्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यानंतर प्रंचड हाणामाऱ्या होतील असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
हेही वाचा…“राहुल शेवाळेंचं ‘ते’ पत्र फडणवीसांना गेलं अन् मनिषा कायंदेंचा गेम झाला”
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?
हेही वाचा…“फर्निचर वाली बाई मुळे पहिली विकेट गेली”, सुषमा अंधारेंला मनसेचा अप्रत्यक्ष टोला