मुंबई : न्यूज अरेने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सर्वेक्षण केले असून यामध्ये भाजपचा सर्वात जास्त १२३ ते १२९ जागा मिळणाल असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या स्थानी शिंदे गट ५५, राष्ट्रवादी ५५-५६ काॅंग्रेसला ५०-५३ तर शिवसेना उबाठा गटाला १७ ते १९ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर १२ जागा अपक्षांना मिळतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष
यामध्ये कथित सर्व्हेनुसार सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पंसती देण्यात आली आहे. फडणवीसांच्या खालोखाल काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, २१ टक्के, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना १४ टक्के, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना १२ तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ९ टक्के मतदारांची पसंती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या बंडला एक वर्ष पुर्ण, ‘NCP’ गद्दार दिवस आंदोलन साजरा करणार, घोषणांही ठरल्या
राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या सर्वेक्षणाचा सध्या खेळ सुरु आहे. यात अनेकांची टक्केवारी दाखवली जाते. ९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीत आहेत, अशी मिश्कील टिप्पणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात झालेल्या शिंदे गटाच्या राजकीय बंडासाठी आदरणीय शरद पवार साहेबांकडे बोट दाखवले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचा चांगलाच समाचार घेतला. बावनकुळे यांना या बंडाची कल्पनाही नव्हती. ज्या व्यक्तीला एक जागा मिळाली नाही, त्यांना कोणी गुप्त गोष्टी सांगेल का? असा खोचक टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…२० जून जागतिक “गद्दार दिन” साजरा करा, ठाकरे गटाची थेट युनोकडे पत्राद्वारे मागणी
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?
हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली