पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एक विजय व एका पराजयला समोरे जावे लागले. राज्यकर्त्यांनी सर्व गोष्टींचा वापर करूनही भाजपची अनेक वर्षांची जागा महाविकास आघाडीने खेचून आणली, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. या निकालावर थोडी खुशी थो़डी गम अशी माझी भावना असल्याचे अजित म्हणाले.
हेही वाचा..“बापटानंतर पुणे भाजपचं काय होणार ? पोटनिवडणुकीत जनतेतील नेताच दिसेना !
महाविकास आघाडी या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली. १९९५ सालापासून कसबा विधानसभा भाजप जिंकत आले आहे. यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या रुपाने आघाडीच्या वतीने अतिशय योग्य उमेदवाराची निवड करण्यात आली. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता अशी धंगेकर यांची जनमानसात ओळख आहे. कसब्याप्रमाणे चिंचवड येथेही विजयाची पुनरावृत्ती घडली असती. परंतु महाविकास आघाडीकडे ज्या दोघांनी तिकीटं मागितली ते दोघेही चिंचवड येथून उभे राहिले असे सांगत राहुल कलाटे आणि नाना काटे यांचा एकत्रित मतांचा आकडा पाहिला तर तो भाजप उमेदवारापेक्षा जास्त आहे, या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. या दोन्ही निवडणुकीत सहानुभूतीच्या मुदद्यापेक्षा महागाई, बेरोजगारी, शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष काढून घेण्यात आला ही भावना मतदारांमध्ये पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा..पुण्यातील पोटनिवडणूका राज्याच्या राजकारणाचा कल ठरवणार!
या पोटनिवडणुकीतून महाराष्ट्रात एकप्रकारचा संदेश गेला आहे की, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले, योग्य उमेदवारास जागेचे वाटप केले तर निश्चितपणे पुढील निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल. आगामी निवडणुकीत आमच्यात कोणतीही बंडखोरी होऊ नये, आमच्यापैकी कोणीही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. कसबा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करत होते. दोघांनी इथे बस्तान बसवले होते. मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असल्याचे दावे त्यांनी केले. पण सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांनीच पराभव केला, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोला अजित पवारांनी लगावला.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता
कोणीही मतदाराला गृहीत धरू नये, मतदारराजाला त्याचा मानसन्मान देण्याचे काम झालेच पाहीजे. आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो, हा अहंकार कोणी दाखवण्याचे कारण नाही, असा टोला त्यांनी लगावला. सत्ताधारी ज्याप्रमाणे स्व. लक्ष्मण जगताप, स्व. मुक्ताताई टिळक यांना मतदानासाठी मुंबईला घेऊन आले. गिरीश बापट संसदेचे अधिवेशन सुरु असतानाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाऊ शकले नाहीत. तरीदेखील त्यांना कशाप्रकारे बाहेर येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायला लावला. हे योग्य नाही. स्वत:च्या निवडणुकीचा विचार करताना दुसऱ्याच्या आरोग्याचा विचार न करणे ही माणुसकी नाही. हे लोकांना आवडत नाही, त्यातून न बोलता कुठे बटण दाबायचे ते लोक दाबतात, अशी टीका अजित पवारांनी केली.
Read also
- हेही वाचा..““कुणाल टिळक याला भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होतं,” निकालानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
- हेही वाचा..पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रवादीची परावलंबी मानसिकता अन् स्थानिक नेत्यांचे अपयश!
- हेही वाचा..“नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” चंद्रकांत पाटलांनी कसब्यातील मतदारांचे मानले आभार..!
- हेही वाचा…सत्तासंघर्षाची सुनावणी २ तासांत संपली, शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं, पुढची तारीख आता होळीनंतर