पुणे : भाजपचा बाल्लेकिल्ला असलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा जळपास 11 हजार ४० मतांनी पराभाव केला आहे. त्यामुळे गेल्या २८ वर्षापासूनचा बाल्लेकिल्ला भाजपच्या हातून सुटला आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..पुण्यातील पोटनिवडणूका राज्याच्या राजकारणाचा कल ठरवणार!
आमचा गड अजिबातच उद्धवस्त झालेला नाही. गेल्या २८ वर्षापासून काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्या मतदारसंघातून लढत होते आणि पराभूत होत होते, तेव्हा त्यांचा गड उद्धवस्त झाला नव्हता का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. आमचा उमेदवार पहिल्यांदाच लढला होता. त्यामुळे हा महाविकास आघाडीचा विजय आहे, असं मुळीच म्हणता येणार नाही, देशाच्या राजकारणात काॅंग्रेसचा सुपडा साफ होतोय. आम्ही कसब्यातील पराभवाचे चिंतन नक्कीच करू पण काॅंग्रेसनेही त्यांच्या देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या पराभवाचे आत्मचिंतन केले पाहिजे. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता
या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कुणाल टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप पक्षाचा कसबा हा अनेक वर्षापासून बालेकिल्ला असतांना, यंदाच्या निवडणुकीत भाजपची हक्काची मते नेहमीच्या प्रभागातून इतरत्र का फिरली गेली याचा अभ्यास चिंतन करावे लागणार आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मला आगामी काळात अधिक कामे करावे लागणार असल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
कुणाल टिळकाच्या प्रतिक्रियेवरही बावनकुळे यांनी भाष्य केलं. मुक्ता टिळक या पुण्याच्या आणि कसब्याच्या मतदारांच्या लाडक्या होत्या. त्यांचे निधन झाल्याने कसब्यातील सर्वसामान्य जनतेलाही दु:ख झाले होते. पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला आम्ही भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होते. मुक्ता टिळक या पुण्याच्या आणि कसब्याच्या मतदारांच्या लाडक्या होत्या. त्यांचे निधन झाल्याने कसब्यातील सर्वसामान्य जनतेलाही दु:ख झाले होते. पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला आम्ही भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होते पण रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल सहानुभूती असल्याने हा निकाल लागला असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
- हेही वाचा..पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रवादीची परावलंबी मानसिकता अन् स्थानिक नेत्यांचे अपयश!
- हेही वाचा..“नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” चंद्रकांत पाटलांनी कसब्यातील मतदारांचे मानले आभार..!
- हेही वाचा…सत्तासंघर्षाची सुनावणी २ तासांत संपली, शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं, पुढची तारीख आता होळीनंतर
- हेही वाचा..“बापटानंतर पुणे भाजपचं काय होणार ? पोटनिवडणुकीत जनतेतील नेताच दिसेना !