पुणे : शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाने निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. यातच केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल आहे. त्याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यातच आता पुन्हा कोर्टाने पुढील तारीख दिली असून तीन आठवड्याच्या नंतर यावर सुनावणी पार पडणार आहे.
हेही वाचा…“शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही”, चिठ्ठीत लिहून तरूणाची आ’त्म’ह’त्या’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका
विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत विधानसभांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. १८ सप्टेंबरला जेव्हा कोर्टाची तारीख आली. त्याच्या ४ दिवस आधी फक्त दिखावा म्हणून सुनावणी ठेवली. अध्यक्षांना या केसमध्ये ट्रिब्युनल म्हणून काम करायचा आहे. सभागृहाचे अध्यक्ष म्हणून नाही. जुलै २०२३ मध्ये उत्तर द्यायचं होतं. यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये दिलं आणि आता कागदपत्रांचे कारण पुढे करत आहेत. तुम्ही याबाबत काही निर्देश द्यावेत. असं कबिल सिब्बल यांनी कोर्टाला विनंती केली.
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय
त्यावर आम्ही ३ महिन्यांची डेडलाईन ठेवली नाही. पण विधानसभा अध्यक्षांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीत सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना कडक शब्दात इशारा देत कामकाजावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्यासंदर्भात पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर होईल. असंही कोर्टाने म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना कुणाची ? निर्णय कुणाच्या बाजूने लागणार? कायदेतज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान
हेही वाचा…नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात, भाजप नगरसेवकांसह ४ जण जागीच ठा’र
हेही वाचा…“मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, वडेट्टीवारांची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा…शेतकरी कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला भाजपाने दिली मोठी जबाबदारी, भाजपची शहर कार्यकारीणी जाहीर
हेही वाचा…काय सांगता..! ‘या’ राज्यात 1 उंदीर पकडण्यासाठी ४१,००० हजार रूपये झाले खर्च, आव्हाडांचा सरकारला जोरदार टोला