पुणे : शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाने निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. यातच केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल आहे. त्याचसंदर्भात आज सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत आहे. तसेच शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांबाबतही आज कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणी आधीच कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी निर्णय कुणाच्याबाबत लागणार याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय
महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून सुरू असलेलं राजकीय नाट्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून संपुर्ण देशासाठी महत्वाचं आहे. याचा परिणाम भारताच्या लोकशाही आणि संविधानावर परिणाम पडणार आहे. भारताच्या संविधानाच्या १० परिशिष्ट्यानुसार कोणत्याही पक्षातून दोन द्वितीयांश बाहेर पडले पाहिजे अन् त्यांचं मर्जर झालं पाहिजे. याची कोणतीही गोष्ट १६ आमदारांच्या बाबतीत झालं नाही. त्यामुळे १६ आमदार अपात्र होणार हे मागच्या वर्षापासून बोलत आहे. जर १६ आमदार अपात्र झालं तर मुख्यमंत्री देखील अपात्र होऊ शकतात. त्यामुळे सरकार आपोआपच पडेल. असं उल्हास बापट यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला
दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्याबाबतीतही विधीमंडळात सुनावणी होणार आहे. यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी कोर्टात सादर केली होती. त्यावर देखील सुनावणी आज कोर्टात होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात, भाजप नगरसेवकांसह ४ जण जागीच ठा’र
हेही वाचा…“मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, वडेट्टीवारांची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा…शेतकरी कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला भाजपाने दिली मोठी जबाबदारी, भाजपची शहर कार्यकारीणी जाहीर
हेही वाचा…काय सांगता..! ‘या’ राज्यात 1 उंदीर पकडण्यासाठी ४१,००० हजार रूपये झाले खर्च, आव्हाडांचा सरकारला जोरदार टोला
हेही वाचा…“शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही”, चिठ्ठीत लिहून तरूणाची आ’त्म’ह’त्या’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका