मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. मराठा आरक्षण प्रश्नही सरकारने अजून मार्गी लावलेला नाही. जनतेचे इतरही महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांना अजूनही उत्तर नाही.
शशिकांत शिंदेचा गेम करणाऱ्यांचा निषेध; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील कार्यालय फोडले
सारथी संस्थेचं, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा पाठीचा कणा मोडायचे ठाकरे सरकारने केलं आहे. मराठा तरुणांचे वय वाढत असताना मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारचा तोडगा गेल्या दोन वर्षांपासून काढलेला नाही, यावर राज्यसरकारने उत्तर दिलंच पाहिजे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी दिली. ते आज मुंबईत बोलत होते.
एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्यसरकावर टीका केली. मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या दोन मुद्द्यांवरून त्यांनी राज्यसरकारला धारेवर धरलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईत आर्यन खान प्रकरण घडलं. या प्रकरणाला ठाकरे सरकारने आणि त्यांच्या सोबत सत्तेत अस्नणाऱ्या मंत्र्यांनी खूप जास्तच आपला वेळ दिला आहे. आर्यन खानला पाठींबा देण्यासाठी आणि त्याला जमीन मिळण्यासाठी संजय राऊत, नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदा घेतल्या. मात्र त्यांना मराठा समाजाच्या मुलांच्या बाबतीत असं काही करुस वाटलं नाही.
साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत
रुजतील ठाकरे सरकारला शाहरुखच्या आर्यन खानची चिंता आहे. मात्र पाटलाच्या मुलाची, देशमुखाच्या मुलीची चिंता नाही. ठाकरे सरकारला वसुलीसाठी वेळ आहे मात्र मराठा समाजाच्या आरक्षणावर साधी बैठकही घ्यायला वेळ नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांत एक तरी बैठक घेतली असेल तर त्याचा फोटो दाखवावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा काळ परत आणावा लागेल, या सरकारला झुकवल नाही तर, हे गेंड्याच्या कातडीचे लोक असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
Read Also :
- मोठी बातमी: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार, राजेश टोपेंची माहिती
- ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; नाना पटोले घेणार मंत्रिपदाची शपथ?
- आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत
- राज्य सरकारसोबत चर्चेला जाणाऱ्या पडळकरांना आणि खोत यांच्या शिष्टमंडळाला कर्मचाऱ्यांनी रोखलं
- मनसे सोडणार असल्याच्या अफवा पक्षातील विरोधकांनीच रंगवल्या; रुपाली ठोंबरेनी सोडले मौन