मुंबई : कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांनी अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची ऑफर आणि त्यानंतर दहा कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना आता समारोसमोर बसवून पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. या प्रकरणावरून आता राज्यातील राजकीय नेत्यांनी आपपाल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर यावर आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावरून सवाल केले आहेत.
हेही वाचा…“खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही”, शिंदे गटातील आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर
सुरज चव्हाण यांनी यावरून आरोपींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, लाच देणे आणि लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ? पैशाची बॅग घेतलेल्या फडणवीस यांच्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी का केली नाही ? त्या महिलेला माध्यमांसमोर तिची बाजू का मांडली जाऊ देत नाहीत ? असा सवाल सुरज चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा
त्यानंतर पुढे बोलतांना त्यांनी दाऊदवरूनही सवाल केले आहेत. दाऊदचा साथीदाराची मुलगी ३ वेळा अमृता वाहिनी दुबई दौरा करते तिथे कोणाला भेटले याची चौकशी पोलीस का करत नाहीत. निष्पक्ष चौकशीसाठी फडणवीस साहेब राजीनामा दिला पाहिजे. उद्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून न उलगडणारे अनेक प्रश्न घेऊन येतोय. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
- हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
- हेही वाचा…कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ”एकनाथ शिंदे” आयोध्या दौऱ्यावर, तारीख ही ठरली
- हेही वाचा…“कसब्यात सध्या रमतोय, मग लोकसभा निवडणुकीचा विचार करू”, रवींद्र धंगेकरांचं सुचक विधान