नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी धुराळा उडवून दिला आहे. राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा होत आहेत. यातच एका पोस्टरमध्ये जनतेला ४५० रूपयात सिलेंडर देण्याचा वादा भाजपने केला आहे. यावरून आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टिका केली आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
भाजपाचे मोठे नेतेही ४५० रूपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजपचेच सरकार आहे, मग भाजप सरकार महाराष्ट्रात ४५० रूपयांना सिलिंडर देत का नाही ? महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का? ही सर्व बनवाबनवी आहे, उज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात ही योजना फेल गेली असून योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजप सरकारने बंद केले. असा हल्लाबोल देखील पटोलेंनी भाजपवर केला.
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”
दरम्यान, भाजपा गाजर देणाऱ्यांचा पक्ष आहे. जिथे निवडणुका तिथे खैरात वाटायची जिथे निवडणुका नाही तिथे लुटमार करायची, हा धंदाच भाजपने सुरू केलं आहे. राजस्थान निवडणुकीत ४५० रूपयात सिलेंडर देण्याचे गाजर भाजपने मतदारांना दाखवले आहे. पण त्याच सिलेंडरकरीता महाराष्ट्रातील जनतेकडून भाजप १००० रूपये मोजून घेत असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून रचला कट, निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा