मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना 13 दिवसाने खातेवाटप करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना अर्थखात देण्यात आलं होतं. त्यानंतर आताही शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवारांना अर्थखातं देण्यात यावा, असा आग्रह धरण्यात आला होता. परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर अजित पवारांना अर्थखांत देण्यात आलं. यावरून आता खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
माझ्या माहितीनुसार शिंदे गट दिल्लीला गेला होता. दिल्लीने यांचं काहीही ऐकलं नाही. राहायचं असेल तर राहा आणि तर जा. अर्थखांत अजित पवार यांना द्यायचं नसेल तर अर्थ खातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असा प्रस्ताव दिल्लीने शिंदे गटासमोर ठेवला होता. त्या प्रस्तावावर शिंदे गट मागे आला. ही माझी माहिती पक्की आहे. अर्थ खात्याचा कौल अजित पवार यांच्या बाजूनचे पडला आहे. तो त्यांच्याकडेच राहणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिंदे गट आणि अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक आहे. अजितदादाच्या गटात अनेक तालेवार नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगलं आहे. अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचं भलं होणार नाही. तरीही अजितदादांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचं महत्व संपलं असल्याची टिका ही त्यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये हमरीतुमरी, नितेश राणे-अमोल मिटकरी एकमेकांत भिडले