मुंबई : अभिनेत्री कंगना रनोत आणि वादग्रस्त वक्तव्य यांचे एक वेगळे नाते आहे. कायम काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा कंगना रनोत नेहमीच प्रयत्न करत असते. यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कंगणामध्ये नेहमीच खटके उडत असतात.
कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
आता पुन्हा एकदा कंगनाने केलेल्या बेताल कृतीसाठी खासदार संजय राऊत, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कंगनाला खडसावले आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. गांधी आणि इतर काहीजण नेताजींना सोपविण्यास तयार झाले होते, अशी बातमीची हेडलाईन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरू तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना तुमच्यकडे सोपविण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.
“विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
तुम्ही महात्मा गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं देखील या बातमीवर लिहिण्यात आलं आहे. स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. एका गालावर थप्पड मारल्यावर दुसरा गाल पुढे केल्यानंतर भीक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे आपले हिरो, मार्गदर्शक, रोल मॉडेल निवडताना हुशारीने निवडा असं देखील तिने म्हटलं आहे.
कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजे. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून खरंतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे.
Read Also :
- सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात