पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाविकास आघाडी आणि भाजप अन् शिंदे असा राजकीय संघर्ष सुरू झाला. यातच महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांना शिंदे सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता आघाडीच्या तीन आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा…“आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून, आरोग्यमंत्री स्वत:चीच पाठ थोपटण्यात व्यस्त”
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या ३ आमदारांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या यावर सुनावणी होणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती दिल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री दत्तात्रय भरणे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पुरंदरचे काॅंग्रेसचे आमदार संजय जगताप या तीन आमदारांनी याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा…“आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, भाजपला संशय, मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या विकास कामांवर हातोडा टाकला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले अनेक निर्णयांना शिंदेंनी रोख लावला. तर राज्यातील विविध विकास कामांचा निधी देखील शिंदेंनी थांबवला. यातच अतुल बेनके यांच्या जवळपास 38 कोटींच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
Read also
हेही वाचा…छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरण..!”राजकीय पोळी भाजण्यासाठी एमआयएम, भाजप अन् शिंदे गटाने दंगल घडवली”
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“ठाकरे गटाचे आणखी दोन खासदार भाजपच्या संपर्कात,” केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा… संजय राऊतांना कोर्टाचा मोठा दणका, ‘इतक्या’ रूपयांचा ठोठवला दंड