मुंबई : कर्नाटकच्या काॅंग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला बळ मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी भाजपला आगामी निवडणुकीत चांगलीच टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. यातच शिउबाठा गटासोबत वंचितने आघाडी करीत असल्याचं जाहीर केलं आहे. पंरतु वंचितला महाविकास आघाडीमध्ये अजूनही समावून घेतलं नाही. याच पार्श्वभूमीवर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुक लढल्याशिवाय भाजपचा पराभव करणे अशक्य आहे. असा पराभव अपेक्षित असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊन जाण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्हाला महाविकास आघाडीत घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही त्यांच्यावर सोडून दिली आहे. असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…मुनगंटीवारांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्विकारलं, आता मोठा राजकीय धमाका होणार ?
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचे संकेत नेत्यांनी दिले आहेत. याचसोबत आघाडीतील इतर घटक पक्ष, संघटना देखील आघाडीतच लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार”
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
हेही वाचा…काॅंग्रेसचा तगडा नेता, फडणवीसांची भेट, भाजपमध्ये जाणार का? दिले उत्तर, म्हणाले…
हेही वाचा…“द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं”, राहुल गांधी