अमरावती : काल पोहरा देवीचं उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतलं. त्यावेळी मी पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहा आणि माझ्या अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्र्याची डिल झाली होती. असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर भाजपच्या अनेक मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“लढाई तुम्ही सुरू केली आहे, त्याचा अंत आम्ही करणार”, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना आव्हान
मुख्यमंत्री बननण्याचा कोणतंही स्वप्न माझं नव्हतं. परंतु शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न आजही माझ्या मनात आहे. तसं वचन मी बाळासाहेब ठाकरे यांना दिलं आहे. हेच मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं होतं. त्यावेळी त्यांनी मान्य केलं. त्यामुळे पंतप्रधान जे सांगताहेत ते बरोबर नाही. जर मी झालो पंतप्रधान तर काय फरक पडणार आहे. ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…“एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घात करायचं”, येवल्यात आव्हाड भुजबळांवर बरसले
दरम्यान, आणीबाणीच्या दरम्यान जनता पक्षाला प्रचार करण्याची मुभा देखील देण्यात आली होती. त्यानंतर जनता पक्ष सत्तेत आला. दुर्गाबाई भागवत यांना आपलं मन मोकळं करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु तशी मुभा आज आहे का तशी मला कल्पना देखील नाही. तसेच स्वातंत्र टिकवण्यासाठी आम्ही देशप्रेमी लढत आहे. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“जानकरांच्या रासपची ‘एक’ला चलो’ ची भूमिका, भाजपने विचार न केल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवणार”
हेही वाचा…९ दिवस उलटून तरी बिनखात्याचे राष्ट्रवादीचे ९ मंत्री, खातेवाटप का रखडले ? कारण आलं समोर
हेही वाचा…“आरोप केलेत, चौकशी करा, अन् शिक्षा द्या,” शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
हेही वाचा…“वय ८२ झालं हे खरं आहे, पण गडी काय आहे तु पाहिलाय कुठे? “, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा
हेही वाचा…“येवल्यात मी तुमची माफी मागण्यासाठी आलोय, पण पुन्हा ती चुक करणार नाही,” शरद पवारांचा भुजबळांवर अप्रत्यक्ष टोला