मुंबई : मुंबईतील साकीनाका मध्ये अमानुष आणि भयानक अशा अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेचा, अतिरक्तस्त्रावामुळे आज अखेर मृत्यू झाला. यामुळे, राज्यात महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा व कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आला असल्याचे प्रकर्षाने जाणवून येत आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांवरून, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? असा सवाल देखील पडत आहे.
‘महिला आणि बालविकासमंत्री असा विचार करतात, याची मला लाज वाटली!’
कारण, ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये. तो कधी नेमला जाणार, याचे उत्तर सरकार देत नाही. अशा विकृत मनोवृत्तींना आणि अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी असलेला महिला अट्रोसिटीचा कायदा राज्यात लागू झालेला नाही, शक्ती कायदा कागदावरच आहे. त्यामुळे, राज्यतल्या महिलांना सरकारला, कायद्याचे अतिरिक्त संरक्षण दयायचे आहे कि नाही? महिलांच्या प्रश्नांना घेऊन सरकार गंभीर आहे कि नाही?, अशी शंका येत आहे.
साकीनाका प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे – चंद्रकांत पाटील
राज्याचे पालक असलेले मुख्यमंत्री, शिवरायांच्या तत्वांचे, त्यांच्या विचारांचे राज्य आणण्याचे स्वप्न बघतात. पण हे सरकार सत्तेत आल्यापासून ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांची आणि नेत्यांची गैरव्यवहाराची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत आणि आता गेल्या काही दिवसांत साकीनाका, अमरावती, पुण्यातील ३ घटना, पालघर, नागपूर या ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, ते पाहता त्यांच्या स्वप्नातले हे सरकार आहे का? हे नेतृत्व आहे का? असा सवाल का करू नये?
मन सुन्न! नराधमांना फाशीच झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
या सरकारमधील एकही महिला नेता या घटनांवर कठोर असा आवाज सरकारच्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात उठवताना का दिसत नाही? आजच्या घटनेच्या नंतर देखील जेव्हा यशोमती ठाकूर, पक्षीय राजकारणाला हात घालतात आणि माणुसकीच्या नात्याने घटनेवर भाष्य न करता दुसऱ्या पक्षावर टीका करतात, हे पाहता या सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी-नेत्यांनी आता जनतेला कशाची लाज आणणे बाकी ठेवले आहे, याचे उत्तर राजकारण न करता या सरकारमधल्या कुणीतरी जनdतेला देणे गरजेचे आहे!
Read Also :
- “साकीनाका प्रकरणात एकच आरोपी आहे, दुर्दैवाने महिलेचा जबाब नोंदवता आला नाही”- हेमंत नगराळे
- साकीनाका बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
- ‘त्या’ दुर्दैवी घटनेचं राजकारण, म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार’
- मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – नवाब मलिक
- ‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया