पुणे : सप्टेंबर २०१९ मध्ये आंबिल ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुर आला होता. तो प्रसंग आजही आठवतो. त्यामुळे कात्रजपासून सुरू झाले दत्तावाडीपर्यंतचा आंबील ओढ्याचा नवा मास्टर प्लॉन तयार करण्यात आला. यामध्ये अतिक्रम, पूलाचे काम आदीचे काम करण्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यामध्ये महापालिकेने बांधलेला नाला सुद्धा काढण्यात आला होता. हा नाला यु आकाराचा झाल्यामुळे नागरिकांच्या घरात सातत्याने पाणी जात असल्याने कारवाईचा बगडा उगारण्यात आला. परंतू कोणत्याही नागरिकाला बेघर करण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण पुणे महापालिकेचे महापौर मुरली मोहोळ यांनी दिले आहे. परंतू पावसाळ्याच्या तोंडावरच का कारवाईचा बडगा उरागण्यात आला असे विचारले असता महापौरांनी माहिती घेवून सांगतो म्हणत पळ काढला.
हे पण वाचा, पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कडून स्थगिती
पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ही कारवाई पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे देखिल स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या
पावसाळ्यात तात्पूरत्या स्वरूपात लोकांना स्थलांतर करावे लागते हे सर्वांना माहित आहे. आंबील नाला हा ८ फूटाचा आहे. त्यामुळे, नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यामुळे नाल्याचे रुंदीकरण करून २४ मिटरचा करण्यात येत आहे. हा २०१९ च्या मास्टर प्लॅनचा भाग आहे. हा काय कुणी काल परवा, ठरलेला प्लॅन नाही. २६ मार्च २०२१ ला या बाबत नोटीस बजावल्या होत्या. शिवाय नागरिकांना तात्पूरत्या स्वरूपात घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे मुरली मोहोळ यांनी सांगितले.
हे पण वाचा, आमची घरे तोडली.., आमच्या माणसांना पोलिस मारतायं.., आम्ही कुठे जायचं..- चिमुकला
यु आकाराचा नाला झाल्याकारणाने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे त्याला सरळ करायचे आहे. त्यामध्ये केवळ १३० घरांचा समावेश आहे. त्यातही ३० घरे अगोदरच सोडून गेली आहेत. त्यामुळे राहिलेल्या घरांचाच प्रश्न आहे. परंतू, महापालिका प्रशासन या नात्याने आम्ही एकाही घराला बेघर होऊ देणार नाही. असे त्यांनी सांगितले. परंतू पावसाळ्याच्या तोंडावरच का कारवाईचा बडगा उरागण्यात आला असे विचारले असता महापौरांनी माहिती घेवून सांगतो म्हणत पळ काढला.
Read Also :
- आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
- “कधीही ठाकरे सरकार कोलमडेल म्हणून, आजच कामे करून घ्या, असे आघाडीतल्या नेत्यांचे धोरण”
- “फडणवीसांनी आरक्षणाचं श्रेय घ्यावं आणि आंदोलनाचं नेतृत्व करावं, मात्र…” भुजबळांनी केली विंनती
- “अनेकजण अनेक रंग दाखवत आहेत, पण तो बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये आहे”
- भाजपाला कधीपासून ओबीसींचा कळवळा? जेव्हा त्यांचे नेतृत्व संपवले तेव्हा हा कळवळा कुठे होता?