मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी देत आहेत. परवाच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारविरोधात पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी, अशी घोषणाबाजी दिली. यावरून सभागृहात देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील धनंजय मुंडे यांना यावरून टोला लगावला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.
“फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं, की परवा धनंजय मुंडे मोठ्या-मोठ्याने ओरडत होते. चलो गुवाहाटी..चलो गुवाहाटी.. अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. जणू काही ते खूप वर्षापासूनचे शिवसैनिक आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. आम्हाला सगळं माहितीय. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, द्या, करूणा दाखवली. पण परत परत ती दाखवता येणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांना लगावला आहे. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला.
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
याप्रकरणावरून रूपाली पाटील म्हणाल्या की, काय दिवस आलेत, आपल्या महाराष्ट्राला. मुख्यमंत्री साहेब सभागृहात आमदारांच्या संमतीचे लफडे, अनौतिक संबंध यावर बोलतात. काय सिद्ध करायचे आहे ,काय उद्दिष्ट्ये आहेत. व्यक्तिगत लफडयात , अनैतिक संबधात. असा कोणता महाराष्ट्राचा विकास, प्रगती करायची आहे ते तरी सांगा? राजकारणात लफडे, अनैतिक संबंधाचा फायदा घेऊन तुम्ही कोणता विकास करणार आहे ते सांगूनच टाका. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
“राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
मुख्यमंत्री साहेब, आपण आणि उपमुख्यमंत्री साहेब आपण दोघांनी प्रेम ,करुणा, आस्था ही शेती प्रश्न, उद्योगधंदे, शिक्षण , बेरोजगारी , कष्ट करणाऱ्या कर्तृत्वान माता भगिनी ,उज्वल भविष्य असलेल्या आपल्या लेकीबाळी यांच्यावर दाखवा, त्याची नितांत गरज आहे. आम्ही महिला स्त्री शक्ती , आया बहिणी आयुष्यभर ऋणी राहू. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ,अवघड झाले आहे महाराष्ट्राचे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
Read also
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल