पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन अलिकडेच पार पडलं. या पुस्तकात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत लिहण्यात आलं आहे. त्यावरून आता भाजपनेत्याकडून टिका टिप्पणी केली जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी ठाकरेंबद्दल लिहिलेल्या दहा गोष्टी वाचत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“राज्यात मोठा राजकीय ब्लास्ट होणार, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील,” भाजप नेत्याचा मोठा दावा
काल पुण्यात भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह राज्यातील सर्व भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टिका केली. तर शरद पवारांच्या पुस्तकातील दहा मुद्दे भर सभेत त्यांनी वाचून दाखविले.
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य
त्यावर ते म्हणाले की, आत्ता एक पुस्तक आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे.”लोक माझे सांगाती.” मी खोटं सांगत नाही. पृष्ठ क्रमांक ३१८ आणि ३१९ यावर जे लिहिलं आहे. त्यातली दहा वाक्य सांगतो.
१) हिंदूह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातली सहजता उद्धव ठाकरेंसह नव्हती.
२) उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बितंबातमी नसे. जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती.
३) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती.
४) त्यांचं कुठे काय घडतं आहे, याचं बारीक लक्ष नसे.
५) उद्या काय घडतं आहे, याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती ती नव्हती.
६) ते ओळखून काय करायचं याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं.त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.
७) त्यांना अनुभव नसल्याने ते सगळं घडत होतं. तरीही ते टाळता येमं त्यांना जमलं नाही.
८) महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली. संघर्ष न करता माघार घेतली.
९) उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पम ऑनलाईन. टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री मात्र प्रत्यक संपर्कात होते.
१० ) उद्धव ठाकरेंचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील फडणवीसांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्या पुस्तकात ठाकरेंच्या चांगल्या १०० गोष्टीपण सांगायला हव्या होत्या. ते शरद पवारांना काॅंल्पिमेंट देत आहेत. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
हेही वाचा…“सुषमा अंधारेंना खरंच मारहाण झाली का? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं