मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील ४१ आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आज या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“राजकीय द्वेषातून एक रुपयाही दिला जात नाही”, रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
अजित पवार गटातील आमदारांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात यावे. असं जंयत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडे निलंबणाची मागणी करण्यात आली आहे, मात्र अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे ३ वेळा अर्ज केला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“पालकमंत्री पद काढलं तरी चंद्रकांत पाटलांचा पुण्यासाठी जिव्हाळा कायम,” कार्यकर्त्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
दरम्यान, अगोदर राष्ट्रवादीच्या बंडखोर ९ मंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर २० आणि पुन्हा १२ अशा एकूण ४१ आमदारांविरोधात अर्ज करण्यात आले आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचुड या याचिकेबाबत काय निर्णय घेण्यात येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात ११ ऑक्टोंबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी होणार असून फेब्रवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने आपला अंतिम निकाल दिला होता. त्या विरोधात ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘या’ पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार, आज घोषणा, इंडिया आघाडीची सत्व परिक्षा तर भाजपलाही धाकधूक
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवणार? फडणवीसांची कॅपसिटी दिल्लीतच
हेही वाचा…“मोदींना निमंत्रित केले, आता राहुल गांधींना बारामतीत आणले तरीही उपयोग होणार नाही”
हेही वाचा…राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पॉवर’ खात्याचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये निराशा..!
हेही वाचा…ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवली तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या