रत्नागिरी : लोकशाहीमध्ये लोकप्रतिनीधींनी लोकांसमोर गेले पाहिजे. आज नितेश राणे सातत्याने सांगत आहेत की याला लोळवू त्याला लोळवू पंरतु माझं त्यांना आवाहन आहे की, तुम्ही या मतदार संघात या आणि आगामी निवडणुकीत उभं रहा. अन् कोकणातील जनता ठरवेल की, कोणाला आस्मान अन् कुणाला जमीनीवर लोळवतील. मला खात्री आहे की निलेश राणे माझ्याविरोधात उभ राहण्याची हिमंत नाही. असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
“राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच मतदार संघात मी निवडणुकी लढविली होती. येथील लोकांनी मला निवडून दिलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत देखील मला लोकांचा पाठिंबा आहे. लोकशाहीमध्ये जो काही नियम आहे. तो मी मान्य करायला तयार आहे. तसेच निलेश राणे यांना माहिती नाही. की आपल्या वडिलांचा म्हणजे नारायण राणेंची चौकशी थांबवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. असा टोला देखील वैभव नाईक यांनी लगावला आहे.
नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”
तसेच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना देखील त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ये लोकं निवडणुकीमध्ये पडले आहेत. सत्ताधाऱ्यांना पाठिशी घालून लांगूनलाचन करून प्रतिनिधी झाले आहेत. मी आणि भास्कर जाधव हे लोकांमधून निवडून आलो आहोत. त्यामुळे आम्हाला या गोष्टी टाळून लोकांकडे लक्ष्य देण्याची गरज आहे. असंही ते म्हणाले.
“शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
निलेश राणे यांची माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहण्याची हिमंत नाही. कारण त्यांच्या वडिलांना देखील एकदा मी धुळ चारली आहे. तसेच येथील मतदार देखील त्यांना आगामी निवडणुकीत धुळ चारल्याशिवाय राहणार नाही. असा टोला देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- “महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध..” जिल्हा परिषदेतील 13,521 पदांची भरती रद्द केल्याने राष्ट्रवादी आक्रमक
- “चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
- “मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
- “कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- “स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”