कोल्हापूर : अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय समीकरण बदलली आहे. यातच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापुरात भाजपचे ग्रामीण शहाराध्यक्ष समरजीत घाटगे नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. हसन मुश्रीफांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर समरजीत घाटगे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…शिंदेंची ‘ती’ चुक अजित पवारांनी केली नाही, वेळीच डाव साधला, शरद पवारांना दिलं धोबीपछाड
कागलच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटके यांच्याकडे पाहिले जाते. यातच हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर घाटगे नाराज झाल्याने काल फडणवीसांनी देखील भेट घेतली होती. आज समजजीत घाटगे कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करत असून आपली पुढची भूमिका मांडणार आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादीत कोण पॉवरफुल ? वाचा दोन्ही गटांच्या आमदारांची संपुर्ण यादी
दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफांनी समरजीत घाटगे यांचा पराभव केला. त्यानंतर प्रत्येक सभेतून समरजीत घाटगे यांनी मुश्रीफांविरोधात रान पेटवलं. यातच पराभवाचा वचपा काढण्यासाठी समरजीत घाटगे यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला. २०२४ च्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती मुश्रीफांचा पराभवर करणार असा प्रण देखील घेतला. पंरतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे घाटगे काय भूमिका घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून पुणे शहाराध्यक्षासाठी ‘या’ नेत्याची निवड, रूपाली पाटलांवरही जबाबदारी मिळणार
हेही वाचा…मंत्रिपदासाठी दंड थोपटून आमदार भिडले, शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावले
हेही वाचा…अजित पवार गटावर शरद पवार घाव घालणार? शरद पवार गटाच्या वर्किंग कमिटीची बैठक, मोठ्या घडामोडी
हेही वाचा…“आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवारांचा झाला,” धनंजय मुंडेंनी सगळंच सांगितलं