मुंबई : राज्यात लवकरच मोठा राजकीय भुंकप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यातच आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. परंतु त्याआधी अजित पवार गटाने काल शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यातच आज देखील अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना घेऊन वाय.व्ही सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…देशात सत्ताधारीच्या बाजूने ३० तर विरोधी पक्षांकडून २४ पक्ष एकवटणार, बैठक सत्रांचं आयोजन
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मागील १५ मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. ३० आमदारांची आमची भूमिका समजून घ्या. अशी विनंती अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात आले आहेत.
हेही वाचा…“विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांना निलंबित करा,” ठाकरे गटाच्या नेत्यांची मोठी मागणी
काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ मंत्री शरद पवारांच्या भेटीला यशवंत चव्हाण सेंटरवर पोहचले होते. त्यानंतर पक्ष एकसंघ राहावा. आशीर्वाद राहावा. अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांकडे केली असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीचे दोन्ही गट शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर काय होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले…! शरद पवारांच्या भेटीला, मोठा राजकीय भुकंप होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत काही तरी शिजतयं, अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला
हेही वाचा…मोठी बातमी..! निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरी यांना अपात्र करा, ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र
हेही वाचा…माढ्यात भाजपला डोकेदुखी, मोहिते पाटील विरुद्ध खासदार निंबाळकर वाद पेटणार? नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मुंबई महापालिकेत २६३ कोटींचा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश